![]() |
पानिपत स्मारक |
१० जानेवारी १७६०
युद्धात बंदुकीच्या गोळ्या लागून शरीराची चाळण झालेला दत्ताजी बळ एकवटून उठत होता.इतक्यात त्याच्यावर नजर पडली नाजिबाची आणि त्याने दत्ताजी कडे धाव घेतली. दत्ताजीचे केस हातात धरून डोके वर उचलत विचारले...
"क्यूँ पाटील और लढोगे"
मरणासन्न अवस्थेत दत्ताजी असलेला दत्ताजी १०० हत्तींच बळ याव अशा आवेशात म्हटला
"क्युं नहीं बचेंगे तो और भी लढेंगे"
उत्तर ऐकून नजीब पिसाळला आणि त्याने दत्ताजीचे मुंडके छाटले, शेजारी असलेल्या गीलच्याच्या हातातील भाला घेतला आणि त्यावर दत्ताजी चे मुंडके खोवले व मैदानात आनंदाने पळत सुटला.
मराठ्यांनी खैबर खिंडीतील पठाणाना दे माय धरणी ठाय केले. नजीबाने ओळखले की मुस्लिम सत्तेचे सार्वभौम केंद्र असणाऱ्या दिल्लीवर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित होणार. म्हणून त्याने इस्लामी सत्तेच्या रक्षणासाठी एकत्र येण्याचे आवाहन दुराणी बादशाह अहमदशहा अब्दाली आणि इतर मुस्लिम बादशहाना केले. आवाहन कसले , त्यांनी इकडे यावे म्हणून अक्षरशः पायघड्या घातल्या. नजीब हा सर्वस्वी पानिपतच्या तिसऱ्या युद्धाला कारणीभूत होता, आणि दत्ताजी राहिला असता तर नजीबाची भीती पूर्ण झाली असती.
रणमर्द दत्ताजींच्या शौर्या समोर नमन🚩🚩🚩
दत्ताजी शिंदे रणामाजी विद्यं ।
तरीही युद्ध खेळावयासाठी सिद्ध ।।
बचेंगे तो और भी लढेंगे म्हनाला ।
मराठा म्हणावे अशा वाघराला ।।
- संभाजीराव भिडे गुरुजी
![]() |
पानिपत वेस |
![]() |
स्मारकाबाहेरील छोटा माहिती फलक |
कुंजपुरा:
पानिपत च्या तिसऱ्या युध्दातील अविभाज्य भाग म्हणजे कुंजपूरा येथील किल्ल्यावर मराठ्यांची चढाई.
परिस्थिती अशी होती की, मराठ्यांची मोहीम लांबत गेली, धान्य संपले, अंगावरचे कपडे फाटले. अहमद शहा ने कुंजपुरा च्या किल्ल्यात धान्य व थोडा फार खजाना लपवला होता. कुंजपुरा च्या किल्ल्याची तटबंदी जवळपास २० फूट उंच आणि त्याला एकूण चार दरवाजे होते. मराठ्यांना बातमी लागताच कूंजपुरा वर मराठ्यांनी हल्ला केला. वणगोजी निंबाळकर ने यात आपली तलवार गाजवली. गारद्यांच्या तोफांनी कूंजपुरा च्या तटबंदीला मातीमोल केलं. कुतुबशाह ला मराठ्यांनी मराठी तलवारीचे पाणी पाजले. कुंजापुरा लुटले, थोडी बहुत रसद हाती लागली.
कूंजपुरा किल्यात सध्या किल्ल्याचे अवशेष काहीच शिल्लक नाहीत.
येथेही मराठा लोकांची वसाहत आहे.
कुंजपुऱ्याची ती गढी बघण्यासाठी मी गेलो आणि गावाच्या सुरवातीलाच एका ज्यूस गाड्यावर गावातील गढीचे अवशेष वगैरे गोष्टींची माहिती विचारली. त्यांच्या माहितीनुसार थोडेफार अवशेष आहेत ते शोधण्यासाठी मी गावात गेलो, अवशेष बघितले आणि परत आलो तर तिथे १०-१५ लोक जमा झाले होते. कारण नव्हत माहीत. पुढे समजल की महाराष्ट्रातून कुणीतरी एकटा मुलगा आला आहे जो गावची माहिती विचारतोय म्हणून ज्यूस वाल्याने गावातील प्रतिष्ठित लोक बोलावले होते.
![]() |
पानिपत मधील काही रोड मराठा |
इतिहासावर चर्चा सुरू झाली. बोलता बोलता एक ६० च्या घरातील व्यक्ती बोलली जी
"पेशवा से गलती होवे से"
त्याला तिथेच थांबवत मी म्हटल
"आप के गाव का युद्ध जो आप बडप्पण से बता रहे हैं वो हम मराठोंकी देन हैं"
पुढे त्यांना सांगितलं की,
"उस समय जो भी निर्णय लिये गये उन परिस्थिती के हिसाब से थे, आज उन निर्णयो पर सवाल खडे करने की जरुरत नहीं"
![]() |
कुंजपुरा मधील काही अवशेष |
![]() |
कुंजपुरा |
![]() |
कुंजपुरा |
![]() |
कुंजपुरा |
![]() |
पानिपत स्मारकाचा आवार |
![]() |
पानिपत स्मारकाची भव्य जागा |
![]() |
पानिपत युध्दाचे शिल्प |
0 टिप्पण्या