Ticker

6/recent/ticker-posts

शिल्प रामायण

रामायण Ramayan Ram Lakshman Sita राम
सर्व देवांनी भगवान विष्णूचा धावा केला

ब्रम्हा आणि महादेव यांच्याकडून रावणाने वरदान मिळवले आणि त्याच्या जोरावर त्याने सर्वांना त्रास द्यायला सुरु केले. सर्व राक्षसांनी हाहाकार माजवला होता. सर्व त्रस्त देव भगवान विष्णू यांच्याकडे मदत मागायला गेले.

भगवान विष्णू यांनी सर्व देवांना सांगितले की ते राजा दशरथाच्या घरी जन्म घेतील आणि रावणाचा वध करतील.
राजा दशरथ याने ऋषी शृंगमुनी यांच्याकडून पुत्रकामेष्ठी यज्ञाचे अनुष्ठान केले.
राजा दशरथाला तीन पत्नी होत्या. अनुष्ठान केल्यानंतर
कौशल्येला राम नावाचा पुत्र झाला, कैकयीला भरत तर सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न नावाचे दोन पुत्र झाले. दशरथाचे चारही राजपुत्र वशिष्ठ ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेऊन अयोध्येत परत आले.
विश्वामित्र राजा दशरथाकडे यज्ञाची रक्षा करण्यासाठी विनंती करताना

विश्वामित्र, राम व लक्ष्मण

तपोवनात विश्वामित्र यज्ञ करीत होते पण त्यांना सुबाहू नावाचा राक्षस त्रास देत होता. म्हणून विश्वामित्र यज्ञाची रक्षा करण्यासाठी दशरथाकडून राम लक्ष्मण यांना घेऊन आपल्या आश्रमात आले.

राम व ताडका युद्ध

आश्रमात जात असताना वाटेत ताडका नावाच्या असुरी स्त्रीने त्यांची वाट अडवली. रामाने आपल्या बाणाने तिचा वध केला.
सूबाहू वध

विश्वामित्राच्या आश्रमात यज्ञाला सुरवात झाली. सुबाहुने पुन्हा त्रास द्यायला सुरुवात केली. रामाने त्याचा वध केला.
राज जनक, विश्वामित्र, राम व लक्ष्मण

रामाचे आश्रमातील कार्य संपन्न झाले. राजा जनकाने विश्वामित्र यांना आपल्या मुलीच्या म्हणजे राजकुमारी सीतेच्या स्वयंवरासाठी आमंत्रण पाठविले होते. विश्वामित्र राम व लक्ष्मण यांच्यासह मिथिला नगरीत गेले जेणेकरून राम व लक्ष्मण हा सोहळा पाहतील.
प्रत्यंचा चडवित असताना राम व समोर सीता

मिथिला नगरीत स्वयंवराला सुरवात झाली. राजा जनकाची एकच अट होती, सभेच्या मध्यभागी ठेवलेल्या शिवधनुष्यावर जो कोणी पुरुष प्रत्यंचा चडवेल त्याच्या सोबत सीतेचा विवाह होईल. सर्व विरपुरूषांनी प्रयत्न केला पण ते धनुष्य कोणीही उचलू देखील शकले नाही. रामाने त्या धनुष्यावर प्रत्यंचा चडवली पण पण प्रत्यंचा चडवीत असताना ते भंगले. अटीप्रमाणे सीतेचा विवाह रामाशी झाला.
रामाचा राज्याभिषेक

राम आणि सीता अयोध्येत आले. राजा दशरथाने रामाचा राज्याभिषेक केला आणि आता राम अयोध्यानरेश झाले.
राम सीता लक्ष्मण
कैकयीला राजा दशरथाने तिच्या कोणत्याही दोन इच्छा पूर्ण करण्याचे वरदान दिले होते. त्याच्या अनुषंगाने कैकयीने इच्छा सांगितल्या की भरत अयोध्येचा राजा व्हावा आणि रामाने चौदा वर्ष वनवास भोगावा.
कैकयीच्या म्हणण्यानुसार राम वनवासाला निघाले सोबत अर्धांगिनी सीता व भाऊ लक्ष्मण देखील आले.
शुर्पणखेचे नाक कापताना लक्ष्मण

वनातील ऋषीमुनींचा आशीर्वाद घेत राम, लक्ष्मण व सीता पंचवटीत येतात जिथे त्यांची भेट जटायूशी होते. पुढे ते पंचवटीत पर्णकुटी बांधून त्यांची दिनचर्या सुरू करतात.
त्यादरम्यान एक सुंदर स्त्री रामाचे सौंदर्य पाहून त्याच्याशी लग्नाच्या इच्छेने पर्णकुटीत येते. राम आणि लक्ष्मण दोघे तिच्या प्रस्तावाला ठोकर मारतात म्हणून ती सीतेला खायला जाते तेंव्हा अगस्ती ऋषींनी दिलेल्या तलवारीने लक्ष्मण तिचे नाक कापतो. हीच ती रावणाची बहिण शुर्पणखा. कापलेले नाक घेऊन खर दूषण नावाच्या तिच्या भावांकडे कडे जाते. बहिणीचा झालेला अपमान पाहून दोघे क्रोधित होतात व रामाशी युद्ध करतात. राम दोघांचा वध करतो.
सुवर्ण मृग

शुर्पणखा ही वार्ता घेऊन रावणाकडे जाते. आपल्या अपमानाचा बदला रावणाने घ्यावा म्हणून शुर्पणखा रावणाला खोटा वृत्तांत सांगते. रावण मारीच नावाच्या राक्षसाला मायावी रूप घेऊन राम लक्ष्मण यांचे लक्ष विचलित करायला सांगतो. मारीच सुवर्णमृगाचे रूप घेतो आणि सीतेला त्याची भुरळ पडते.
मारीच वध

सीतेच्या हट्टापायी राम आणि लक्ष्मण त्या हरणाच्या मागे जातात. राम मारीच राक्षसाला मारतो.
रावण सीतेचे हरण करताना

इकडे रावण साधूचे रूप घेऊन भिक्षा मागायला येतो. भिक्षा घेण्याच्या निमित्ताने रावण सीतेला लक्ष्मण रेषेच्या बाहेर बोलवतो आणि तिचे हरण करतो.
रावण आणि त्याच्या पायाशी जटायू

सीतेला आपल्या विमानात बसवून रावण नेत असतो ते जटायू बघतो आणि त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो. दोघात युद्ध होते आणि जटायू जखमी होतो.
जखमी जटायू रामाला सर्व घटना सांगतो आणि जटायूचा मृत्यू होतो. जटायूवर अंतिम संस्कार करून राम सीतेच्या शोधत निघतो.
पुढे कबंध नावाच्या गंधर्वाकडून समजते की रावण सीतेला दक्षिणेकडे घेऊन गेला आहे.
राम हनुमान भेट

दक्षिणेचे मार्गक्रमण सुरू असताना वाटेत त्यांना हनुमान भेटतो. तो राम आणि लक्ष्मण यांना सुग्रीवकडे घेऊन जातो. सुग्रीव त्याची व्यथा रामासमोर मांडतो आणि बाली कडून आपले राज्य परत मिळवण्यासाठी मदत मागतो.
सातही वृक्षांना एकाच बाणात छेदताना

रामाच्या शक्तीवर त्याचा विश्वास नसल्याने तो रामाला ताडाचे सात झाड एका बाणात पडायला सांगतो. राम जेंव्हा ते सातही वृक्ष पाडतात तेंव्हा सुग्रीवाला विश्वास बसतो आणि तो बालीला युद्धासाठी पुकारतो.
सुग्रीवचा राज्याभिषेक
पुढे सुग्रीव बाली युद्धात राम बालीचा वध करतात आणि सुग्रीवाला किष्किंधा नगरीचा राजा बनवितात.
राम स्वतः सुग्रीवाचा राज्याभिषेक करतात आणि अंगदाला युवराज घोषित करतात.
श्रीराम हनुमानाला अंगठी देताना
रामाच्या आज्ञेने वानरसेना सीतेच्या शोधात निघते. श्रीराम हनुमानाला आपली एक अंगठी देऊन सांगतात की, सीतेला ही अंगठी दाखव जेणेकरून ती तुझ्यावर विश्वास ठेवेल. वानर सेनेला संपाती म्हणजेच जटायूचा मोठा भाऊ भेटतो जो वानरसेनेला सीता लंकेत असल्याची माहिती देतो.
सीता आणि हनुमान भेट

जांबुवंत व अंगद, हनुमानाला त्याच्या असीम शक्तींची आठवण करून देतात आणि समुद्र लांघुन लंकेत सीतेच्या शोधासाठी जाण्यास सांगतात. हनुमान लंकेत जातो आणि श्रीरामाची अंगठी दाखवून सीतेला आपली ओळख पटवून देतो.
दशानन रावणासमोर हनुमान
नंतर हनुमान अशोक वाटिकेची नासधूस करतो. हनुमानाला पकडण्यासाठी रावणाचा मुलगा मेघनाद येतो आणि हनुमानाला नागपाशात बांधून रावणासमोर नेतो.
रावण हनुमानाच्या शेपटीला आग लावायची आज्ञा देतो आणि मग हनुमान जळत्या शेपटीने लंकेला आग लावतो.
हनुमान रामाला भेटून सीतेची हकीकत सांगतो आणि राम वानरसेनेसह लंकेत जाण्यासाठी समुद्रकिनारी येतात. तिथे शिवाचे पूजन केले जाते. हेच ते तामिळनाडू मधील रामेश्वरम्.




सेतू बांधून श्रीराम लंकेत प्रवेश करतात. रावण आपल्या शक्तीने राम आणि लक्ष्मण यांचे शरीरापासून वेगळे केलेले डोके सीतेला पाठवतो जेणेकरून सीता त्याची होईल, पण नंतर रावणाची ही चाल सीतेच्या लक्षात येते.
पहिल्या रकान्यात अंगद व रावण

श्रीराम युवराज अंगदाला शांतीदूत म्हणून रावणाच्या सभेत पाठवतात. तिथे योग्य आसन न मिळाल्याने अंगद आपल्या शेपटीने स्वतःसाठी योग्य आसन तयार करतो.

रावण आपल्या अहंकारात पुरता बुडाला असल्याने अंगदाचा शांतीप्रस्ताव मान्य करत नाही.
वानरसेना आणि रावण यांच्यात युद्ध सुरू होते. प्रचंड जिवीतहानी झाल्याने स्वतः रावण युद्धासाठी सज्ज होतो. पण श्रीरामासमोर त्याचा टिकाव लागत नाही व त्याचा पराजय होतो.
मधल्या रकान्यात कुंभकर्णाला झोपेतून जागे करताना

रावण आपल्या सैन्याला आदेश देतो की कुंभकर्णाला झोपेतून जागे करा. रावणाच्या आज्ञेने कुंभकर्ण युद्धात उतरतो आणि हाहाकार माजवतो.

युध्दात तो वानरसेनेला पायदळी तुडवत होता. नंतर श्रीराम स्वतः कुंभकर्णाचा वध करतात.
दशानन रावण
त्यांनतर युध्दात रावणाचा मुलगा मेघनाद उतरतो. श्रीराम त्याचा देखील वध करतात.
मुलाच्या आणि भावाच्या शोकात बुडालेला रावण पुन्हा युद्धास सज्ज होतो. आपल्या रथावर स्वार होऊन तो युद्धात उतरतो.
रथावर आरूढ श्रीराम

इकडे इंद्र आपला रथ श्रीरामांना देतो.
आता युद्ध बरोबरीचे होणार होते. रावणाचे शिर कितीही वेळा वेगळे केले तरी त्याजागी परत नवीन शिर येत होते.
रावणाचा वध

बिभीषण सांगतो की रावणाच्या बेंबीत अमृत आहे त्यामुळे तिथे आधी बाण मारा आणि नंतरच तो मरेल. आणि अशा प्रकारे श्रीराम रावणाचा वध करतात.

जय श्रीराम!!!

टिप: सर्व शिल्पं अमृतेश्वर मंदिर, अमृतपुरा, कर्नाटक येथील आहेत

टिप्पणी पोस्ट करा

5 टिप्पण्या